पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना: 20वा हप्ता 25 जुलैपासून खात्यात जमा होणार, ई-केवायसी आणि ओळखपत्रे आवश्यक

Pm kisan Yojana 20th EMI: देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सूत्रांनुसार, हा हप्ता 25 जुलै २०२५ रोजी जमा होण्याची शक्यता आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिहार दौरा असल्यामुळे याच कार्यक्रमात हप्त्याची घोषणा होऊ शकते.
वर्षाला मिळतात ₹६,०००
या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात ₹६,००० ची आर्थिक मदत दिली जाते. ती तीन समान हप्त्यांत म्हणजेच ₹२,०००-₹२,००० करून थेट बँक खात्यावर जमा केली जाते. याआधीचा १९वा हप्ता फेब्रुवारी २०२५ मध्ये जमा झाला होता. मात्र यंदाचा जून महिन्यात येणारा हप्ता तांत्रिक कारणामुळे जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.
ई-केवायसी अनिवार्य
योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. ई-केवायसी म्हणजे आपली ओळख ऑनलाइन पद्धतीने तपासली जाते. हे करण्यासाठी शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या वेबसाइटवर जाऊन आधार क्रमांक आणि मोबाइल नंबरद्वारे OTP टाकून प्रक्रिया पूर्ण करावी.
जर हे शक्य नसेल, तर जवळच्या CSC केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक केवायसी करता येते.
शेतकरी ओळखपत्रही महत्त्वाचे
शेतकरी ओळखपत्र देखील या योजनेतील लाभासाठी आवश्यक आहे. यामध्ये शेतकऱ्याची माहिती, त्याचे जमीन कागद आणि आधार यांची नोंद असते. जर तुमचे कार्ड जुने असेल किंवा माहिती चुकीची असेल, तर ते कृषी कार्यालयात किंवा CSC केंद्रात जाऊन अपडेट करणे गरजेचे आहे.
लाभ मिळवण्यासाठी काय काळजी घ्यावी?
- तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले असावे.
- तुमचा मोबाईल नंबर नोंदणीकृत असावा.
- जमिनीची कागदपत्रे योग्य आणि अद्ययावत असावीत.
- pmkisan.gov.in वर जाऊन ‘लाभार्थी स्थिती’ तपासावी.
जर यापैकी कोणतीही माहिती चुकीची असेल, तर तुमचा हप्ता अडकू शकतो.
शेतकऱ्यांसाठी अन्य सुविधा
सरकारकडून पीएम किसान योजनेसोबत किसान क्रेडिट कार्ड (KCC) सुविधा दिली जाते. यामुळे शेतकऱ्यांना कमी व्याजदरात शेतीसाठी कर्ज घेता येते. यासाठी तुम्ही बँकेत किंवा वेबसाइटवरून फॉर्म भरू शकता.
तसेच सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘किसान ई-मित्र’ नावाचा चॅटबॉट सुरू केला आहे. या चॅटबॉटमुळे शेतकरी १० भाषांमध्ये मार्गदर्शन मिळवू शकतात.
अडचण आल्यास कुठे संपर्क करावा?
जर कोणतीही अडचण असेल, तर शेतकरी PM किसान हेल्पलाइन १५५२६१ किंवा ०११-२४३००६०६ वर संपर्क करू शकतात.
तसेच pmkisan.gov.in या वेबसाइटवर जाऊन नोंदणीची स्थिती पाहता येते.
पुढील योजना आणि सुधारणा
ही योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आर्थिक आधार ठरली आहे. त्यामुळे सरकार वेळोवेळी सुधारणा करत आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे या योजनेची पोहच अधिक सुलभ आणि पारदर्शक झाली आहे. योग्य वेळेत नोंदणी व माहिती अपडेट करून घेतल्यास हप्ता वेळेवर मिळतो आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन चांगले होते.

I’m Akshay Sakrate, a blogger with 3+ years of experience covering government schemes, women empowerment, and rural development. I aim to provide clear and reliable information to help people access the benefits they deserve. I simplify complex schemes into easy-to-follow guides, making government services more accessible to all.