मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना: महाराष्ट्र सरकारकडून गरजू विद्यार्थ्यांसाठी “मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना” राबवली जात आहे. जर 1 मार्च 2020 नंतर मुलाचे दोन्ही पालक किंवा एक पालक मृत झाला असेल आणि मुलाचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल, तर त्या मुलाला दरमहा ₹4000 शिष्यवृत्ती दिली जाते.

योजनेचे मुख्य लाभ:
- पात्र विद्यार्थ्यांना दरमहा ₹4000 आर्थिक मदत
- दोन मुलांनाही लाभ घेता येतो
- शिक्षण चालू ठेवण्यास मदत
- आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना आधार
पात्रता (Eligibility):
- 1 मार्च 2020 नंतर एक किंवा दोन्ही पालकांचे निधन झालेले असावे
- मुलाचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असावे
- शाळेत 5वी ते 12वी मध्ये शिक्षण घेत असावे
अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे:
- बाळ आणि आईचे संयुक्त बँक खाते
- शाळा ओळखपत्र/शाळेने दिलेले पत्र
- आधार कार्ड (आई व मुलासाठी)
- वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा पुरावा (₹21000/₹75000)
- शाळेचा दाखला
अर्ज कुठे करायचा?
फॉर्म भरून जिल्हा बाल संरक्षण युनिट/जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे जमा करावा.
फॉर्म तालुक्याच्या तहसील कार्यालयातही उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क:
विद्यार्थ्यांनी 9168255005 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.


I’m Akshay Sakrate, a blogger with 3+ years of experience covering government schemes, women empowerment, and rural development. I aim to provide clear and reliable information to help people access the benefits they deserve. I simplify complex schemes into easy-to-follow guides, making government services more accessible to all.